मंगळवार, ५ एप्रिल, २०११

Navin Sanvatsar!

नवीन वर्षाच्या शुभेच्छा! 

हितगुज सुरु केले तेव्हा मनात खूप काही होते.....अजूनही आहे....पण तेव्हा वाटले कि मी रोज लिहिले तरी बरेच लिहायचे राहून जाणार. पण अचानक असे काही झाले कि ते विचार एकतर "शिळे" झालेत कारण माझा लिखाणाचा वेग कमी पडत होता नाहीतर ते विचार निघूनच गेलेत. "महिला दिन" होता तेव्हा ३/४ दिवस आधी पासून खूप खूप वेगवेगळे विचार होते मनात....काही खूप positive , काही negative ...काही क्रांतिकारक....पण मग अरुणा शानबाग ची माहिती इतक्या वेगाने काळजात घुसली कि मन सुन्न झाले.....आणि काहीही लिहिलेच नाही. आणि आज अरुणा शानबाग ला ना वर्तमान पत्रात जागा ना TV वर.......सुरवातीला मी पण खूप कळवळून विचार केला आणि आज जाणवते आहे कि माझ्या विचारांची तीव्रता कमी झालेली आहे. असे का होते? ह्या आधी पण अरुणा शानबाग तेवढ्याच दुखात होती आणि ह्या नंतर पण असणार. मग फरक कुठे पडला? मग जपान ची  सुनामी आली....परत काळजात घुसली......बस तेवढेच..... असे का होते?  दुखाची, विचारांची तीव्रता वर्तमान पत्रे, tv आणि net तर control करत नाहीत ना? सतत नाविन्याचा घ्यास इतका लागलाय का  कि दुखे पण नवीन हवीत, काळज्या पण नवीन हव्यात? 

तुम्हाला   काय वाटते? तुम्ही तुमचे विचार कसे manage करता?  तुमच्या विचारांवर कुणाचा आणि कश्याचा प्रभाव आहे? 

माझे काही विचार निघूनच गेलेत....ते कसे ते सांगेन....तो पर्यंत तुम्ही सांगा तुम्ही कसे manage करता आपले चांगले, वाईट, ताजे -शिळे, positive -negative विचार? 

नवीन वर्षाचे परत स्वागत.